General knowledge questions and answers in marathi | gk questions in marathi …सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी

……..Gk questions in marathi…….

1. मानवाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या काळाला काय म्हणतात ? =प्रागैतिहासिक काळ

2. मानवाला लेखनकला अवगत झाल्यानंतरच्या काळाला काय म्हणतात ?=ऐतिहासिक काळ

3. ऐतिहासिक काळात भारतावर पहिले आक्रमण कोणी केले ?
=राजा दारियसने

Telegram group मध्ये जॉईन व्हा

4. 20 व्या शतकात भारतात कोणत्या संस्कृतीचा शोध लागला ?
=सिंधू संस्कृतीचा

5.  प्राचीन जगातील विविध महत्वपूर्ण झालेल्या संस्कृतीपैकी भारतात कोणती संस्कृती होऊन गेली आहे?=सिंधू संस्कृत

6.सिंधू संस्कृतीचा अस्तित्व कालखंड कोणता होता ?=
सुमारे इ. स. पूर्व 2500

7.  सिंधू संस्कृती कोणत्या वंशाच्या लोकांची होती ?=द्रविड

Telegram group मध्ये जॉईन व्हा

8.सिंधू संस्कृतीचे क्षेत्र सध्या कोठे आहे ?  =पाकिस्तानमध्ये

9. भारत देशाचा ‘इंडिया’ असा उल्लेख सर्व प्रथम कोणी केला ?
=युनानियांनी

10.शून्य ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या लोकांनी शोधून काढली ?=भारतीय

11. इ.स. पूर्व 7 व्या शतकापासून नावारूपाला आलेले प्राचिन भारतातील विद्यापीठ कोणते होते ? =नालंदा

12. जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते.?=ऋषभदेव

13. वर्धमान महावीरांचा जन्म कोठे झाला?=कुंदग्राम (नवीन नाव कुंडलपूर )

14. जैन साहित्याला काय म्हणतात.?=आगम

15. जैन धर्माचे महत्त्वाचे जुने धर्मग्रंथ कोणत्या भाषेत आहे ?
=अर्धमागधी

16. जैन धर्मातील सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन व सम्यक चरित्र या त्रिरत्नांचा उपदेश देणाऱ्या वर्धमान महावीरांचा जन्म केव्हा झाला?=इ.स. पूर्व 599

17. गौतम बुद्धांचा जन्म कोठे व केव्हा झाला ? = लुम्बिनी येथे इ.स. पूर्व 563

18. गौतम बुद्धांनी सारनाथ येथे दिलेल्या पहिल्या प्रवचनाला काय म्हणतात ? =धर्म-चक्र परिवर्तन

19. गौतम बुद्धांनी दिलेल्या वचनांचा संग्रह कोणत्या ग्रंथात आहे?=धम्मपद

20. बौद्ध धर्माचे महत्वाचे धर्मग्रंथ कोणत्या भाषेत आहेत?
=पाली

21. गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या कथांना काय म्हणतात ?= जातक कथा

22.  गौतम बुद्धाच्या मुलाचे नाव काय होते ?=  राहूल

24. गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या 24 कथा कोणत्या ग्रंथात सांगितलेल्या आहे?=बुद्धवंश

25. दुःख निवारण करण्यासाठी गौतम बुद्धांनी किती मार्ग सांगितले आहे ?=अष्टांग मार्ग

26. श्रीलंकेतील मंदिरात गौतम बुद्धांचा दात कोणत्या ठिकाणी ठेवलेला आहे ?=कॅन्डी येथे

26 (अ) वर्धमान महावीरांचे महानिर्वाण केव्हा झाले ? =- इ.स. पूर्व 527

27. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कोणत्या वर्षी झाले ?= – इ.स. पूर्व. 487 –

28. भारताबाहेर बौद्ध धर्माच्या प्रसाराचे प्रयत्न कोणी केले ?= – सम्राट अशोक

29. प्राचीन भारताच्या इतिहास काळातील पहिला सम्राट कोण होता ?=चंद्रगुप्त मौर्य

30. कौटिल्य हा कुटनितीज्ञ कोणत्या राजाचा गुरु होता ? =चंद्रगुप्त मौर्या

31. विशाखादत्तने चंद्रगुप्त मौर्य व चाणक्याविषयी कोणते नाटक लिहिले आहे ? =- मुद्राराक्षस

32.अलेक्झांडर उर्फ सिकंदरने कोणत्या वर्षी भारतावर आक्रमण केले ?= इ.स. पूर्व 327

33. अलेक्झांडर दी – ग्रेटचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ? =इ.स. पूर्व 323

34. कोणत्या युध्दातील प्रचंड प्राणहानीमुळे सम्राट अशोकाचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारले ?=कलिंगचे युध्द

35. सम्राट अशोकाने भारताबाहेर बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना कोठे पाठविले होते ? = नेपाळ व श्रीलंकेत

36. कोणत्या शतकापासून भारतात रुग्णालयांची सुरुवात झाली ?=इ.स. पूर्व – तिसऱ्या

37. वैष्णव पंथाची स्थापना कोणी केली ?=  वासुदेव नामक ऋषीने

38. उंच मोठ्या दगडी स्तंभावर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात ?= स्तंभालेख

39. तांब्याच्या जाड पत्र्यावर कोरुन तयार केलेल्या मजकूराला काय म्हणतात ?=ताम्रपट

40. ऋग्वेद या पवित्र ग्रंथामध्ये एकूण किती सुत्रे आहेत ?=1027 सुत्रे

41. मुख्य पुराणे एकूण किती आहेत ? =अठरा

42. वेदांचे एकूण किती प्रकार आहेत ?=चार

43. भारतीय संगीताचा उगम कोणत्या वैदिक वाङ्मयात आढळते ?= सामवेदात

44. प्राचीन काळामध्ये व्यक्तिच्या जीवनात किती संस्कार महत्वाचे मानले जात होते ? – सोळा संस्कार

45. व्यक्तिच्या जीवनातील सोळा संस्कारांपैकी पहिले संस्कार कोणते ? = गर्भाधान

46. व्यक्तिच्या जीवनातील आवश्यक संस्कारापैकी शेवटचे संस्कार कोणते ? =अंतिम संस्कार

47. प्राचीन हिन्दुस्थानचा नेपोलियन कोणाला म्हणतात ? = समुद्रगुप्तला

48. रोम या शहराची निर्मिती कोणी केली होती ?= रोम्युलस व रेमस या दोघा भावांनी

49. येशू ख्रिस्ताचा जन्म कोणत्या वर्षी झाला ? = इ.स. पूर्व 4 मध्ये

50. शक या राजाने आपली स्वतंत्र कालगणना केव्हापासून सुरू केली ? = इ.स. 78 पासून

51. ग्रिक प्रवाशी मेगॅस्थेनिसने प्राचीन भारताविषयी अत्यंत उल्लेखनीय केलेले प्रवासवर्णन कोणत्या पुस्तकात आहे ? = इंडिका

52. भारताचा भूगोल कोणत्या संशोधकाने लिहिलेला आहे ?= टॉलेमीने

53. विक्रम संवत् ही विक्रम राजाची कालगणना केव्हापासून सुरू झाली ?= इ.स. 58 पासून

54. सॉक्रेटिसचा शिष्य कोण होता ?= प्लेटो

55. भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक जर्मन पंडित कोण होते ?=मॅक्स मुलर

56. इ.स. 399 मध्ये कोणता चिनी प्रवाशी बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारतात आला होता ? =फाहियान

57. वेरूळचे कैलास लेणे कोणत्या राज घराण्याने घडविले आहे ? = राष्ट्रकूट

58. भारतात सर्वात जास्त लेण्या कोणत्या राज्यात आहे ? =महाराष्ट्र

59. जगात सर्वप्रथम कोणते दोन धातू शुध्द करण्याचे तंत्र भारतीयांनी शोधले ? = सोने व लोह

60. प्राचीन भारताच्या इतिहासात किती प्रकारचे विवाह प्रचलीत होते ? – आठ

61. भारतीय मुद्रेचे नाव “रूपया” सर्वात पहिले कोणत्या शासकाने ठेवले ? = शेरशहा सुरी

62. कोणार्कच्या सूर्य मंदिराचे निर्माण कोणी करून घेतले ? =नरसिंह प्रथमने

63. हिंदुस्थानाला आपला देश माणनारा पहिला मोगल सम्राट कोण होता ?= सम्राट अकबर

64. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे प्राचीन भारतातील कोणत्या व्यवस्थेचे प्रकार आहे ? = वर्णव्यवस्थेचे

65. ब्रम्हचर्माश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम हे प्राचीन भारतातील कोणत्या व्यवस्थेचे प्रकार होते ?=  आश्रम व्यवस्था

66. ज्योतीषशास्त्रा संबंधी ‘पंचसिध्दांतिका’ हा प्रसिध्द ग्रंथ कोणी लिहिला ? = वराह मिहिराने

67. मराठी भाषेला राजभाषेचे स्थान प्रथमतः कोणत्या राजघराण्यात मिळाले ? = यादव घराण्यात

68. मराठी भाषेची पहिली वहिली घडण कोणत्या राजघराण्याच्या काळात झाली ?=राष्ट्रकूट

69. ‘रघुवंशम’ हे महाकाव्य कोणी लिहिले ? =महाकवी कालिदास

70. वर्धन घराण्याचा संस्थापक कोण होता ? = पुष्पभूती

71. वर्धन घराण्यातील सर्वात कुशल राजा कोण होता ? =हर्षवर्धन  

72. वाकाटक घराण्याचा मूळ संस्थापक कोण होता ? =विंध्यशक्ती

73. वत्सगुल्म (वाशिम) या वाकाटकांच्या दुसऱ्या शाखेचा संस्थापक कोण होता? =  राजा सर्वसेन

74. दक्षिण भारतातील पल्लव राजघराण्याचा काळ हा शिल्पकलेचा कोणता युग मानला जातो ? = सुवर्णयुग

75. चोल राज्याचा प्रतीक चिन्ह काय होता ? = वाघ

76. सातवाहन राजघराण्याचा (राज्याचा) संस्थापक कोण होता ? = शिमुक उर्फ शिमरू

77. कोणत्या राजवंशाला आंध्रप्रदेश वंश म्हटल्या जाते ?= सातवाहन वंश

78. इ.स. 8 व्या शतकात जगप्रसिध्द विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी  केली ? = राजा धर्मपालने

79. पृथ्वीराज चौहाण माने संयोगिता हिला पळवून तिच्याशी विवाह केल्याची गोष्ट कोणत्या ग्रंथात आहे ? =पृथ्वीराज रासो

80. पारंपरिक भारतीय समाजात बलुतेदारांची संख्या किती होती ? = बारा

२. मध्ययुगीन इतिहासाची माहिती सामान्य ज्ञान

१.पृथ्वीराज चौहानचा पराभव करून त्याला देहांताची शिक्षा कोणी दिली ? = मुहम्मद घोरीने

2. दक्षिणेतील प्रचंड विजयनगर साम्राज्य कोणी स्थापन केले ?=
हरिहर व बुक्क या भावांनी

3.  विजमनगर साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ सम्राट कोण होता ?  = कृष्णदेवराय

4. तेनाली रमण हा कोणाच्या दरबारात होता ?=कृष्णदेवराय(विजयनगर)

5.मुहम्मद गझनवी (गझनी) याने भारतावर किती स्वाऱ्या केल्या ?=सतरा

6.दिल्ली येथे मुसलमानी राजवटीची स्थपना कोणी केली ?=कुतुबुद्दीन ऐबकने

7. 13 व 14 व्या शतकात महाराष्ट्रातून कोणत्या प्रकारची मंदिरे बांधल्या गेली ? =हेमाडपंथी

8.इ.स. 1450 मध्ये जर्मनीत पहिला छापखाना कोणी सुरू केला ? =गटेनबर्गने

9.तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल केव्हा जिंकून घेतले ? =इ.स. 1453 मध्ये

10. मोनालिसा या जगप्रसिध्द कलाकृतीचे निर्माते कोण आहे ? = -लिओनार्डो – दा – व्हीन्सी

11.पॅराशुटची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ?=  लिओनार्डो-दा- व्हीन्सी

12 .वास्को-द-गामा 1498 मध्ये भारतातील कोणत्या बंदरावर येऊन पोहोचला?= कालिकत (केरळ)

13.वास्को-द-गामा हा कोणत्या देशाचा दर्यावर्दी खलाशी होता ? = पोर्तुगीज

14.महामुनी पराशर यांनी लिहिलेल्या कृषी कोषाचे नाव काय आहे ?= पराशर तंत्र

15.विश्व अणुपरमाणुंचे बनले आहे हा सिध्दांत कोणी मांडला ? = महर्षी कणादने

16.सागरमार्गे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघालेला पहिला व्यक्ती कोण ? =फर्डिनांड मॅगेलन

17.इतिहासात ‘प्रबुध्द राजा’ म्हणून ख्यातनाम झालेल्या राजाचे नाव काय आहे?= अकबर

18.पोर्तुगिजांचा पहिला गव्हर्नर कोण होता ? – डी. अल्मेडा

19. कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी गोवा जिंकून आपल्या साम्राज्यस जोडले?= सन 1510

20. कोणत्या उत्तम प्रशासक पोर्तुगिज गव्हर्नरने केरळमधील कोच्ची येथील किल्ला बांधला आहे ? =अल्बुबर्कने

21. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ? =इ.स. 1600 मध्ये

22. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना का करण्यात आली ?=  भारताशी व्यापार करण्यासाठी

23. डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ? =इ.स. 1602 मध्ये
.
25. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ? =सन 1664 मध्ये

26. ब्रिटीश कॅप्टन हॉकिन्स भारतात केव्हा आला होता ?= इ.स. 1609 मध्ये

27. कॅप्टन बेस्ट याने कोणाकडून सुरत येथे वसाहत स्थापण्याची परवानगी मिळविली? = गुजरातच्या सुभेदाराकडून

27. सर थॉमस रो यांनी भारतात कोणाकडून काही व्यापारी सवलती मिळविल्या ?=जहाँगिर राजा

28. -ईस्ट इंडिया कंपनीचा इंग्लंडमधील व्यवस्थापन कोण पाहत असे?=द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स

29. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय भारतात कोणकोणत्या ठिकाणी होते ?=मुंबई, मद्रास व कलकत्ता (जुने नाव)

30. टिपू सुलतान हा कोणाचा मुलगा होता ? =हैदर अलीचा

31. टिपू सुलतान या म्हैसुरच्या राजाचा अंतिम पराभव कोणी घडवून आणला?=लॉर्ड वेलस्लीने

32. अमीर खुसरो याने भारतीय संगीताबद्दल कोणते पुस्तक लिहिले आहे ?=नूहसिपहर

33. नादिरशहाने भारतावर कोणत्या वर्षी आक्रमण केले ?
=सन 1738

34. कर्नाटकातील तिनही युध्दे कोण-कोणत्या देशांमध्ये झाले ?
=इंग्रज व फ्रेंच

35. कोलकताच्या अंधार कोठडीत किती इंग्रजांचा गुदमरून मृत्यु झाला होता ?=123 जणांचा

36. हिंदुस्थानात ब्रिटीश सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला गेला ?=प्लासीच्या लढाईने

37. तैनाती फौजेची अंमलबजावणी कोणी केली ?=लॉर्ड वेलस्लीने

38. इंग्रजांनी फोर्ट सेंट विल्यम हा किल्ला भारतात कोठे बांधला ?=कोलकाता

39. भारतातील पहिली रेल्वे (मुंबई ते ठाणे) कोणी सुरू केली?  =लॉर्ड डलहौसीने

40. कोणत्या ब्रिटीश राजकुमाराला पोर्तुगिजांनी मुंबई बंदर हुंड्याच्या स्वरूपात दिले होते ? = प्रिन्स चार्ल्स

41. बंगालमध्ये एशियाटीक सोसायटीची स्थापना कोणी केली ?
=सर विल्यम जोन्सने

42. प्राचीन व ऐतिहासिक इमारतींच्या रक्षणाचा कायदा कोणी केला= लॉर्ड कर्झनने

43. ब्रिटीश पार्लमेंटने रेग्युलेटिंग अॅक्ट कोणत्या वर्षी पास केला ?=इ.स. 1773
 
44. इ.स. 1773 च्या कायद्यानुसार भारतामध्ये कोणत्या ठिकाणी सुप्रिम कोर्टाची स्थापना झाली ?=कोलकाता

45. सुप्रिम कोर्ट (कोलकाता) चे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून कोण बनले ? =सर एलिजा इम्पे

46. रेग्युलेटिंग ॲक्टमधील उणीवा दूर करण्यासाठी दुसरा कोणता सुधारित कायदा झाला ?=पिट्स इंडिया ॲक्ट

47. भारतातील मुलकी सेवेचा पाया कोणी घातला ?= लॉर्ड कॉर्नवॉलिसने

48. वॉरन हेस्टिंग्जने प्रचलित असलेल्या कायद्यांचे संकलन करून त्यांना कशामध्ये लिखित स्वरूप दिले ? =कॉर्नवालिस कोड

49. जमिनीच्या मालकिविषयी कायमधरा पध्दत कोणी सुरू केली ?=कॉर्नवॉलिसने
 
50. प्रत्येक जिल्ह्यात दिवाणी व फौजदारी न्यायालय कोणी सुरू केले ?=वॉरन हेस्टिंग्जने

51. पंजाब व आग्रा प्रांतासाठी महालवारी पध्दत कोणी सुरू केली ?=वॉरन हेस्टिंग्जने

52. भारतात रयतवारी पध्दत कोणी सुरू केली ? = सर थॉमस मनरोने

53. लॉर्ड डलहौसीने पोस्ट ऑफिस ॲक्ट केव्हा लागू केला ? = इ.स. 1854 मध्ये

54. लॉर्ड डलहौसींच्या विविध सुधारणांमूळे त्याला काय म्हटले जाते ?=आधुनिक भारताचा निर्माता

55. औद्योगिक क्रांती सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये घडून आली ? =इंग्लंडमध्ये

56. दादाभाई नौरोजी यांनी भारताच्या आर्थिक शोषनावर प्रकाश टाकण्यासाठी कोणता सिध्दांत मांडला ?= संपत्तीचे निस: रण –

57. –  पिट्स इंडिया अॅक्ट भारतात कोणत्या वर्षी आले ?
= इ.स. 1784

58. पहिली तार यंत्रणा कोणत्या शहरांमध्ये सुरू झाली ? =
  कोलकाता ते आग्रा
 
59. 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा कोणी संमत केला ?=लॉर्ड विल्यम बेंटिकने

60. महत्वाच्या सामाजिक सुधारणा घडवून आणल्यामुळे विल्यम बेंटिकला काय म्हटले जाते ? =आधुनिक भारताचा उद्गाता

61. फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली?=इ.स. 1789

62. शेरशहा याने चौसाच्या लढाईनंतर आपले हे नाव धारन केले, त्याचे मुळ नाव काय होते ? = शेरखान

63. शेरखान (शेरशहा) हा कोणत्या वंशाचा होता ?= सूर वंशाचा
 
64. मध्ययुगात धर्मसुधारणा चळवळ कोणत्या खंडात सुरू झाली ? =युरोप खंड

65. बायबलचे इंग्रजी भाषांतर प्रथम कोणी केले ? =जॉन विक्लिफने

66. रशियन राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली ? = इ.स. 1717

३. मराठ्यांचा इतिहास

1. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला ?
=19 फेब्रुवारी 1630

2. शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ?=शिवनेरी किल्ल्यावर

3. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले कोणाच्या दरबारात होते ?=आदिलशहा

4.शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ यांच्या आई व वडीलांचे नाव काय होते ?=माळसाबाई व लखुजी जाधव

5.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलीचे नाव काय होते ?=सखुबाई

6.शहाजहानने निजामशाही केव्हा नष्ट केली ?=ऑक्टोबर 1636

7.शिवाजी महाराजांनी सातारा जिल्हयातील जावळीवर केव्हा हल्ला केला ? =इ.स. 15 जानेवारी 1656

8. – प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केव्हा केला ? =1 10 नोव्हेंबर 1659

9.पुरंदरचा तह कोणामध्ये झाला ?=मिर्झाराजे जयसिंग व शिवाजी महाराज

10. औरंगजेबाला भेटण्यासाठी आगऱ्याला जाताना शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत कोणाला घेतले होते ? =मुलगा बाल संभाजीला
 
11. शिवाजी महाराजांनी कोणत्या राज्याची स्थापना केली ? =हिंदवी स्वराज्याची

12. शिवाजी महाराजांची बांधलेल्या एका सागरी किल्ल्याचे नाव ? = सिंधुदुर्ग किल्ला

13. आपल्या स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी कशाची निर्मिती केली ? =अष्टप्रधान मंडळ

14. राज्यव्यवहार कोषाची निर्मिती करण्याची संकल्पना मांडून तो सिध्द करण्यासाठी कोणी प्रयत्न केले ? = शिवाजी महाराजांनी

15. शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय ?= मालोजी राजे

16. संभाजी राजे हे मराठयांचे छत्रपती केव्हा बनले ? =10 जाने, 1681 मध्ये

17. शिवाजी महाराजांच्या सख्ख्या थोरल्या भावाचे नाव काय ?=व्यंकोजी राजे

18. संभाजी राजाच्या मृत्युनंतर मराठ्यांचे छत्रपती कोण बनले ? =राजाराम
 
19. छत्रपती राजारामने मराठ्यांची नवी राजधानी कोठे स्थापन केली ? = सातारा

20. राजाराम या पराक्रमी छत्रपतीचा वयाच्या तिसाव्या वर्षी मृत्यू कोठे झाला ?= सिंहगडावर
 
21. छत्रपती राजारामच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाईने कोणाला गादीवर बसविले?=दुसरा शिवाजीस

22. छत्रपती राजारामच्या गैरहजेरीत मराठा सरदारांना एकत्र आणण्याचे काम कोणी केले ? = महाराणी ताराबाईने

23. औरंगजेबाच्या मृत्युनंतर (1707) मराठ्यांचे सर्व किल्ले कोणी परत जिंकून घेतले ? =महाराणी ताराबाईने

24. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दाचे नेतृत्व कोणी केले ?
=महाराणी ताराबाईने

25. खेडची प्रसिध्द लढाई कोणामध्ये झाली ? – =महाराणी ताराबाई व छ. शाहू

26. महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू यांच्यामध्ये 23 वर्ष चाललेल्या संघर्षाला काय म्हणतात ?=यादवी युध्द

27. मराठ्यांचा पहिला पेशवा कोण होता ?=बाळाजी विश्वनाथ

28. बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचा कोणता मुलगा मराठ्यांचा पेशवा बनला ?= पहिला बाजीराव

29. 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने तैनाती फौज स्विकारली ?= दुसरा बाजीराव

30. इ.स. 1803 मध्ये अंजनगांव सुर्जी येथे कोणामध्ये तह झाला ?=इंग्रज व शिंदे

31. छत्रपती शाहूचा राज्यभिषेक कोठे झाला ?=सातारा येथे

32. मराठ्यांचा सर्वश्रेष्ठ सेनापती कोण होता ?=बाजीराव पेशवा

33. मराठ्यांचा शेवटचा पेशवा कोण होता ?=दुसरा बाजीराव

34.इंग्रज व मराठे यांच्यात एकूण किती युध्द झाले?=तीन

35मराठ्यांचा शेवटचा पराभव कोठे झाला होता ? = पंढरपूर जवळ आष्टी येथे

36  मराठ्यांचा अखेरचा पराभव कोणत्या गव्हर्नर जनरलने केला ?=लॉर्ड हॉर्डिंग्जने

37. मराठी सत्तेचा -हास कोणत्या वर्षी झाला ?=इ.स. 1818

38.  कोणत्या तहाने मराठ्यांचे स्वातंत्र्य संपुष्टात आले ?
=वसईच्या तहाने

39. खालसा राज्याची स्थापना कोणी केली ?= महाराजा रणजितसिंगाने

40. पंजाबचा सिंह कोणास म्हणतात ? महाराजा रणजितसिंगाला

41. शीख राज्याची स्थापना कोणी केली ?= महाराजा रणजितसिंगाने
 
42. गुरू गोविंद सिंगाचा खून कोठे झाला ? =नांदेड येथे

43. अहमदशहा अब्दाली कोणत्या प्रदेशाचा सत्ताधीश होता ?= अफगाणीस्थान

44. शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते ? =भवानी तलवार

४. १८५७ चा उठाव व आधुनिक भारताचा इतिहास

1. भारतात पहिला राष्ट्रीय उठाव कोणत्या वर्षी झाला ?= इ.स 1857 मध्ये

2. पहिले अखिल भारतीय स्वातंत्र्य युध्द केव्हापासून सुरू झाले ?=1857 पासून

3. इ.स. 1857 च्या उठावाचा पहिला भडका कोणत्या लष्करी छावणीत उडाला ?= बराकपूर

4.  1857 च्या राष्ट्रीय उठावाचे नेतृत्व कोणी केले ?= बहादूर शहा जफरने

5.इ.स. 1857 मध्ये झाशीचे स्वातंत्र्य कोणी घोषीत केले ?= राणी लक्ष्मीबाईने
 
6.कोणत्या पहिल्या क्रांतीकारकाला फाशीची शिक्षा देण्यात आली ?=मंगल पांडे

7. बराकपूर येथील लष्करी छावणीत सैनिक असलेला व इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडणारा क्रांतीकारक कोण होता ?= मंगल पांडे

8. ब्रिटीशकालीन भारतातील ‘आय सी एस’ या परीक्षेचे नाव बदलून ‘आय ए एस’ असे कोणी केले ?= सरदार पटेल

9. इ.स. 1857 च्या उठावामध्ये सैनिकांनी दिल्ली काबीज
केल्यानंतर भारताचा बादशहा म्हणून कोणाला गादीवर बसविले ?
=बहादूर शहा जफरला

10. मै मेरी झांशी नही दूंगी’ हे उद्गार कोणाचे आहे ?= राणी लक्ष्मीबाई

11. भारतातील आद्यक्रांतीकारक कोणाला म्हणतात ? = वासुदेव बळवंत फडकेला

12. पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली ?= महात्मा फुलेंनी

13. भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण होत्या ?=सावित्रीबाई फुले
.
14. भारतातील क्रांतीकारी विचारांचा जनक कोणाला म्हटले जाते ? = बिपीन चंद्र पालला

15. कोणत्या स्त्री क्रांतीकारकाने पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या  झाडल्या ? =बिना दासने

16. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण ?=वॉरन हेस्टिंग्ज

17. भारताचा पहिला व्हॉईसरॉय कोण होता ?=लॉर्ड कॅनिंग

18. बंगाल प्रांताची फाळणी कोणत्या वर्षी व कोणी केली ?
=इ.स. 1905, लॉर्ड कर्झनने

19. पुण्यात इंग्रज अधिकारी रॅडची हत्या कोणी केली ?
= चाफेकर बंधूंनी

20. ऑल इंडिया मुस्लिम लिगची स्थापना कोठे झाली ?
= ढाका येथे

21. पहिले महायुध्द कोणत्या वर्षी सुरू झाले ? =सन 1914 मध्ये

22. कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हटल्या जात होते ? – =रौलेट कायद्याला

23. रौलेट कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ?
= सन 1917 मध्ये

24. मुंबई येथे कोणत्या गिरणी कामगाराने परदेशी कापडाच्या
ट्रकखाली बलीदान दिले? = बाबू गेणुने

25. ‘वंदे मातरम्’ हे वृत्तपत्र कोणी काढले ?=अरविंद घोष

26. क्रांतीकारक खुदीराम बोस यांनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या गाडीवर बाँब टाकला ? =लॉर्ड किंग्जफोर्डच्या

27. ब्रिटीश अधिकारी कर्झन वायलीची हत्या कोणी केली ?- =मदनलाल धिंग्राने

28. साँडर्स या इंग्रज अधिकाऱ्याचा वध कोणी केला ?= राजगुरू व भगतसिंगाने

29. रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार केव्हा मिळाला ?= 1913

30. गदर पक्षाची स्थापना कोणी केली ?=लाला हरदयाळने

31. मद्रास प्रांतात होमरूल लिगची स्थापना कोणी केली ? =डॉ. ऍनी बेझंटने

32. लोकमान्य टिळकांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी कोठे पाठविले होते ?=मंडालेच्या तुरूंगात

33.लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ?=सन 1920 मध्ये

34.आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?=रासबिहारी बोसने

35. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले ?=सुभाषचंद्र बोसने

36. आझाद हिंद सेनेची घोषणा कोणती होती ?=चलो दिल्ली

37. आझाद हिंद सेनेतील स्त्रियांच्या सैनिकी पथकाचे नाव झाशीची राणी होते. ती फौज कोणी तयार केली होती ?=
लक्ष्मी स्वामीनाथन

38. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात कोणत्या वर्षी मृत्यू झाला?सन 1945

39. हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेचे प्रमुख कोण होते ? चंद्रशेखर आझाद

40. अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली ?= स्वातंत्र्यवीर सावरकरांनी

41. स्वातंत्र्यपूर्व काळात 26 जानेवारी, 1930 रोजी भारतीय क्रांतीकारकांनी देशभर कोणता दिवस साजरा केला ? =स्वातंत्र्य दिन

42. जालीयनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?= अमृतसर (पंजाब)

43. जालीयनवाला बाग येथे गोळी चालविण्याचे आदेश कोणी दिले होते ?=जनरल डायरने

44. ब्रिटीशांच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय होते ? =युनियन जॅक

45. गांधीजींचा महात्मा असा उल्लेख सर्वप्रथम कोणी केला ?= रवीन्द्र टागोरांनी
 
46.  सरहद्द गांधी यांचे मूळ नाव काय होते?=खान अब्दुल गफार खान
 
47. भूदान चळवळीची सुरूवात कोणी केली होती ?=
विनोबा भावेंनी

48. पहिली गोलमेज परिषद कोणत्या साली झाली ? =   सन 1930

49. महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा कोणत्या पूर्ण वर्षी केली ?=
  सन 1930
  
50. सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले ?=  इ.स. 1927

51. महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यात कोणता करार झाला होता ? =- – पुणे करार (1931)

52 नताल इंडियन काँग्रेसची स्थापना कोणी केली ?= महात्मा गांधींनी
 
53. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशीची शिक्षा केव्हा देण्यात आली ? =23 मार्च, 1931

54. दुसरे महायुध्द कोणत्या वर्षी सुरू झाले ?=इ.स. 1939 मध्ये

55. असहकार चळवळीची सुरूवात कोणी केली ?=महात्मा गांधीनी
  
56 बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी कोणत्या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली ?= इंग्लंड
  
57. बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ? =सरदार वल्लभभाई पटेल

58. गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ? =सरोजीनी नायडूने

59. अवध येथील स्वातंत्र्य लढयाचे नेतृत्व कोणी केले ?=बेगम हजरत महलने

60. हैद्राबाद मुक्ती लढ्याचे नेतृत्व कोणी केले होते ? – डॉ. टी. बी. कुन्हाणे.

हे पण वाचा…….

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी

तुम्हाला सामान्य ज्ञान मराठी माहिती नक्कीच आवडली आसेल आशी आम्हाला आशा आहे.

आश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolution .Net ला नंक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला general knowledge संपूर्ण माहिती – In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions.
ला भेट द्यायला विसरू नका.




















Leave a Comment